Homeमहाराष्ट्रनिंभोरा येथे संविधान जागर अभियानांतर्गत ‘संविधानाचा अमृत महोत्सव’ जनजागृती संवाद

निंभोरा येथे संविधान जागर अभियानांतर्गत ‘संविधानाचा अमृत महोत्सव’ जनजागृती संवाद

रावेर दि .17 (प्रतिनिधी )  निंभोरा येथील सम्राट फाउंडेशन आणि आम्ही संविधान वादी यांच्या माध्यमातून संविधान जागर अभियानांतर्गत “संविधानाचा अमृत महोत्सव” या विशेष उपक्रमाचा शुभारंभ निंभोरा येथील जि. प उर्दू शाळेत जनजागृती संवाद कार्यक्रमाने करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन संविधान जागर अभियानाचे मुख्य प्रचारक अनोमदर्शी तायडे यांनी केले.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये संविधानाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अनोमदर्शी तायडे यांनी आपल्या प्रभावी मार्गदर्शनातून संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये, तसेच संविधानातील महिलांना दिलेले विशेष हक्क याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की —

 “प्रत्येक भारतीय नागरिकाने संविधान वाचणे, समजणे आणि त्याचे रक्षण करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. संविधान फक्त कायद्याचा दस्तऐवज नाही, तर तो भारतीय समाजाचे आत्मसंकल्पन आहे.”

या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शन संविधान प्रचारक अनोमदर्शी तायडे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार, कर्तव्ये आणि महिलांना दिलेले समानतेचे अधिकार यावर सखोल विचार मांडले.

▪️संविधान हे महिलांच्या सशक्तीकरणाचे मूळ साधन आहे. महिलांना शिक्षण, रोजगार, आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार संविधानाने दिला आहे.

▪️कलम १४ ते १६ द्वारे स्त्री-पुरुष समानतेचा सिद्धांत घटनेत स्पष्टपणे नमूद करण्यात आला आहे.

▪️ कलम ३९ (अ) नुसार महिलांना पुरुषांप्रमाणेच समान वेतनाचा अधिकार मिळतो.

▪️कलम ५१ (अ)(ई) अंतर्गत प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे की, स्त्रियांप्रती असलेल्या अपमानजनक प्रथा आणि वर्तनाचा त्याग करावा.

▪️ समाजात महिलांविषयी असलेल्या पूर्वग्रहांचा नाश करून संविधान साक्षर समाज निर्माण करणे ही आजची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

 “संविधान वाचणे ही केवळ बौद्धिक कृती नाही, ती आपल्या अस्तित्वाच्या सन्मानाशी जोडलेली नैतिक जबाबदारी आहे. प्रत्येक भारतीयाने संविधान समजून त्याचे पालन केले पाहिजे.”

संविधान जागर अभियानांतर्गत २६ नोव्हेंबर २०२५ रोजी होणाऱ्या संविधान दिनानिमित्त तीन दिवसीय ‘संविधान अधिवेशन’ आयोजित करण्यात येणार आहे. या अधिवेशनाच्या पूर्वतयारी म्हणून ७५ गावांमध्ये संविधान जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. निंभोरा येथील हा संवाद कार्यक्रम त्याच मोहिमेचा एक भाग होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक हर्षल कुऱ्हे यांनी केले, तर सुरेख सूत्रसंचालन प्रफुल्ल कुऱ्हे यांनी केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एस. डी. चौधरी, शाळेचे मुख्याध्यापक विकास जनबंधू, उपशिक्षक गुलाब उघाडे, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गौतम कुऱ्हे, दस्तगीर खाटीक, सामाजिक कार्यकर्ते पंकज तायडे, नितेश पोहेकर हे मान्यवर उपस्थित होते.

संविधान जागर अभियानाचे प्रचारक अक्षय तायडे, निलेश बार्हे, ईश्वर लहासे, करन तायडे, मयूर सपकाळे यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
याशिवाय अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर्स, ग्रामपंचायत सदस्य, तसेच अनेक पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

संविधान जनजागृतीचा हा उपक्रम ग्रामीण भागात लोकशाही मूल्यांचा प्रसार घडविणारा ठरत असून, आगामी संविधान अधिवेशनासाठी जनमानसात जागर निर्माण करणारा ठरला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...
error: Content is protected !!