मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज दादा बनसोडे यांच्या सूचनेनुसार रिपब्लिकन कामगार सेना राज्य कमिटीच्या वतीने मुंबई मंत्रालय येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व समाज कल्याण मंत्री यांच्या कार्यालयात भेट देऊन निवेदन सादर करण्यात आले.
पाचोरा तालुक्यातील लाख तांडा येथे मागासवर्गीय समाजावर झालेल्या अन्याय प्रकरणी संबंधित गुन्हेगारांना तात्काळ अटक करून अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय मिळावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच या प्रकरणात प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

समाज कल्याण मंत्र्यांच्या कार्यालयात निवेदन देताना रिपब्लिकन कामगार सेना राज्य समन्वयक विक्रम भाई खरे, उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष हनुमंत वाघमारे, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष राजू दादा दोंदे, कोकण प्रदेश प्रमुख संघटक आकाश भाई गायकवाड व इतर सहकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर प्रकरणात शासनाने तातडीने लक्ष घालून अन्यायग्रस्तांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी रिपब्लिकन कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली.
























