रावेर (लक्षवेध न्युज नेटवर्क ) दि . 1 रावेर पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर झालेल्या प्रशासकीय बदलीमुळे स्थानिक शासन व्यवस्थेत पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. ग्रामसेवकांच्या बदली प्रकरणात दिसणारा विरोधाभास आणि मनमानी कारभार यामुळे तालुका स्तरावर प्रशासना विरोधात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. काही ग्रामसेवकांकडे केवळ एकच गाव आहे, तर काहींना तीन गावांचा पदभार सोपवला जाणे या विषयावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
सतत सात ते आठ वर्ष एखाद्या गावात सेवा देणाऱ्या ग्रामसेवकांच्या बदलीसाठी विनंती अर्जानंतर प्रशासनाने त्यांची बदली केली अथवा केली गेली, मात्र नवीन बदली होई पर्यंत तात्पुरती प्रभारी नेमणूक करणे कोणत्या कारणावरून योग्य समजले जाते ? यामुळे ग्रामपंचायत विभागात मनमानी कारभाराच्या विरोधास आरोप उठत आहे.
रावेर पंचायत समितीत ग्रामसेवकांचे सामाजिक आणि प्रशासकीय हित सांभाळताना उद्भवलेली अशी परिस्थिति तालुका प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. प्रशासकीय बदली मिळालेल्या ग्रामसेवकांना त्वरीत स्थायी गाव देण्यात यावे, तसेच दोनदा प्रभारी नेमणूक करण्याची पद्धत थांबवावी अशी मागणी तालुका ग्रामीण भागातील आणि स्थानिक नागरीकां कडून मागणी होत आहे.
या वादग्रस्त बाबीमुळे पंचायत समितीच्या कामकाजावर ही परिणाम होत असल्याने स्थानिक प्रशासनाने अधिक पारदर्शक आणि न्याय्य बदली धोरण राबवणे आवश्यक आहे. ग्रामसेवकांचे भविष्य आणि गावातील विकास यासाठी सुसंगत आणि योग्य नेमणुकीवर भर देणे हेच काळाची गरज बनली आहे.
रावेर पंचायत समितीतील ग्रामसेवकांच्या बदली प्रक्रिया आणि प्रभारी नेमणुकीतील विरोधाभास प्रशासनासाठी मोठे आव्हान ठरले आहेत. प्रशासनाने ग्रामसेवकांना योग्य ती गावे त्वरीत बदलून दिली पाहिजे आणि मनमानी कारभार पूर्णपणे थांबवून एक स्पष्ट, पारदर्शक आणि सामंजस्यपूर्ण धोरण अमलात आणले पाहिजे. यामुळे स्थानिक प्रशासनाची विश्वासार्हता वाढेल आणि ग्रामपंचायत विभागात शिस्त व सुव्यवस्था प्रस्थापित होईल.
























