Homeताज्या बातम्यारसलपूर-बक्षीपूर तक्रारींना महिन्यांचा विलंब, तर विवरे ॥ बु ॥ येथे दोन विस्तार...

रसलपूर-बक्षीपूर तक्रारींना महिन्यांचा विलंब, तर विवरे ॥ बु ॥ येथे दोन विस्तार अधिकाऱ्यांची अचानक प्राथमिक चौकशी पंचायत समितीच्या कामकाजावर संशय…

रावेर दि .16 (प्रतिनिधी) रावेर तालुक्यातील रसलपूर व बक्षीपूर ग्रामपंचायतीतील कथित गैरकारभार आणि अनियमिततेबाबत पंचायत समितीकडे तक्रारी दाखल होऊन बराच कालावधी उलटला असतानाही चौकशीची प्रक्रिया अजून ही सुरू झालेली नाही. ग्रामस्थांकडून वारंवार पाठपुरावा करून ही संबंधित प्रकरणात कोणती ही ठोस हालचाल दिसून येत नसल्याने नाराजी वाढू लागली आहे.

दरम्यान विवरे ॥ बु ॥ येथे दोन विस्तार अधिकारी जाऊन तातडीने प्राथमिक चौकशी करून आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या चौकशी प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. एका बाजूला गंभीर तक्रारी असून ही चौकशी रखडलेली, तर दुसरीकडे अचानक तातडीने चौकशी या वेगळ्या निकषा मुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे.
रसलपूर व बक्षीपूर ग्रामपंचायतीतील विविध विकास कामांमध्ये अनियमितता झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी संबंधित विभागाकडे दिल्या आहेत. या तक्रारींची चौकशी करण्यासाठी विस्तार अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामांचा ताण असल्याचे कारण सांगितले जात आहे. मात्र विवरे ॥बु ॥ येथे दोन अधिकाऱ्यांची तातडीने भेट दिल्याने नागरिकांकडून दुजाभावाचा आरोप होत आहे.

रावेर पंचायत समितीला ISO नामांकन मिळाले असले तरी लोकांच्या तक्रारींवर तातडीने कारवाई होत नसल्याने या नामांकनाच्या कार्यक्षमतेवर ही प्रश्न उपस्थित होत आहेत. सर्व तक्रारींची समान निकषांवर पारदर्शक चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

रसलपूर-बक्षीपूर तक्रारी असूनही चौकशी का रखडली ?

विवरे ॥ बु ॥ येथे अचानक दोन विस्तार अधिकारी का दाखल झाले ?

चौकशीसाठी वेगळे निकष लावले जात आहेत का ?

पंचायत समितीच्या कारभारात पारदर्शकता आहे का ?

नागरिकांची प्रतिक्रिया

“तक्रारी सर्व गावांच्या आहेत, चौकशीचा वेग वेगवेगळा का?”

संतप्त ग्रामस्थ – रसलपुर , बक्षीपुर 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

रावेर-पुनखेडा-पातोंडी मार्गाची दुरवस्था; डांबरीकरणाच्या विलंबामुळे नागरिक संतप्त खड्डे, सैल खडी आणि उडणाऱ्या धुळीमुळे...

0
रावेर, दि. 30 (प्रतिनिधी)- पुनखेडा-पातोंडी या महत्त्वाच्या मार्गाचे काम अपूर्ण राहिल्याने नागरिक आणि शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे...

बुऱ्हाणपूर – अंकलेश्वर महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीला ऐतिहासिक यश…

0
रावेर दि .29 (प्रतिनिधी )  बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे तसेच रावेर शहरात महिलांसाठी ठिकठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत या...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

रावेर-पुनखेडा-पातोंडी मार्गाची दुरवस्था; डांबरीकरणाच्या विलंबामुळे नागरिक संतप्त खड्डे, सैल खडी आणि उडणाऱ्या धुळीमुळे...

0
रावेर, दि. 30 (प्रतिनिधी)- पुनखेडा-पातोंडी या महत्त्वाच्या मार्गाचे काम अपूर्ण राहिल्याने नागरिक आणि शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे...

बुऱ्हाणपूर – अंकलेश्वर महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीला ऐतिहासिक यश…

0
रावेर दि .29 (प्रतिनिधी )  बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे तसेच रावेर शहरात महिलांसाठी ठिकठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत या...
error: Content is protected !!