कोपरगाव दि . 28 प्रतिनिधी ( नवनाथ उल्हारे ) गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाने कहर केला असून शेतकऱ्याचे व सामान्य व्यवसाय चे जनजीवन धोक्यात आले असून ते मोठे अडचणीचा सामना करत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शिर्डी राहता या ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मोठे नुकसान झाले आहे शेतकरी आता तातडीने राज्य सरकारकडून मदतीची अपेक्षा करत आहे दरम्यान हवामान विभागाने (imd) 28 सप्टेंबर रोजी राज्यात जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असून अनेक जिल्ह्यासाठी रेड ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केले आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज 28 सप्टेंबर राज्यातील काही भागांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता आहे नागरिकांनी आणि प्रशासनाने अत्यंत सतर्क राणे आवश्यक आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये सुद्धा पावसाने जोर दाखवला आहे. नदी नाल्यांना संपूर्ण पाण्याचा वेढा सासून अक्षरश नागरिकांच्या घरांमध्ये पाण्याचे सावट निर्माण झालेले आहे. गोदावरी नदी काठावरील गावांसाठी ही सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. या वाढत्या पाण्याचे प्रवाहने शेतकऱ्याच्या मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दुकानदार व्यावसायिकांवरही धंद्याचा मोठा परिणाम झालेला आहे. कोपरगाव राहता शिर्डी आणि श्रीरामपूर परिसरात वादळी पावसाचा मोठा फटका बसला आहे विशेष म्हणजे नेवासा तालुक्यात ढगफुटी दृश्य पाऊस झाल्याने परिस्थिती गंभीर झाले आहे नेवासा तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अशीच परिस्थिती कोपरगाव तालुक्यामध्ये सुद्धा झालेले आहे. चासनळी येथे चक्क गोदावरी नदीचे पाणी घरामध्ये घुसू नये या अनुषंगाने चासनळी गावचे ग्रामपंचायतीने भर पावसात जेसीपी द्वारे नाल्या खोदून सहकार्य केले. आता शासनाकडून काही मदत कार्य मिळते का नाही याच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
























