जळगाव (प्रतिनिधी ) दि . 8 जून रोजी जळगाव जिल्हा कार्यकारणी निवडी संदर्भात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक जिल्हा अध्यक्ष प्रकाश सरदार यांच्या अध्यक्षतेखाली “पद्मालय” शासकिय विश्राम गृह, जळगांव येथे सकाळी १०:०० वाजता होणार आहे.
बैठकीत आंबेडकरी चळवळीत काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, साहित्यिक, कलाकार, पत्रकार, अधिकारी व कर्मचारी वर्ग यांना आमंत्रित करण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित कार्य करण्यात इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांनी या बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन केले गेले आहे.
या बैठकीत भीमा कोरेगाव जयस्तंभाच्या जागेवर अतिक्रमणाच्या विरोधात माननीय उच्च न्यायालयात चालू असलेल्या खटल्याच्या पाठिंब्यासाठी चर्चा होणार आहे. याबरोबरच, या हक्काची लढाई गाव स्तरावर पोहचविणे, जिल्हा कार्यकारणीची निवड करणे, व तालुक्यातील जवाबदारी वाटून देण्यावरही विचार विनिमय होईल.
सरकारने भिमा कोरेगाव विजयस्तंभ विकासासाठी निधीची अनेक वेळा घोषणा केली आहे; परंतु अतिक्रमण व जागेच्या मालकीच्या हक्कासाठी चालू असलेला न्यायालयीन खटला प्रगतीत असल्याने, विकास कार्य ठप्प झाले आहेत. म्हणून न्यायालयाचा खटला जिंकणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी ठरली आहे.
या अतिक्रमणाच्या विरोधातील लढ्यात जनजागृती करण्यासाठी कोरेगाव भीमा जयस्तंभ बचाव समिती स्थापन करण्यात आले आहे. समितीचे अध्यक्ष दादाभाऊ अभंग यांच्यासह, जिल्हा अध्यक्ष प्रकाश सरदार देखील या ऐतिहासिक लढ्यात सक्रिय सहभाग घेत आहेत.
बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन करताना बाबुराव वाघ यांनी सर्व गोष्टी ध्यानात घ्या आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे सांगितले आहे.
या लढ्यात प्रत्येकाने सहभागी व्हण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून न्यायालयीन खटला जलद गतीने होईल आणि लवकर निकाल लागेल.
























