Homeताज्या बातम्यारस्त्याच्या दुरवस्थेमुळे बस गावात येईना; विद्यार्थ्यांची रोज अर्धा किलोमीटर पायपीट....

रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बस गावात येईना; विद्यार्थ्यांची रोज अर्धा किलोमीटर पायपीट….

मुक्ताईनगर दि .12 (प्रतिनिधी )- नायगाव व पिंप्रीनांदू गावांना जोडणारा रस्ता अस्तित्वात असून ही त्याची योग्य देखभाल न झाल्याने एसटी बसेस गावात न येता बाहेरील मार्गाने धावू लागल्या आहेत. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थिनींसह प्रवाशांना दररोज सुमारे अर्धा किलोमीटर पायपीट करून बस पकडावी लागत असून पालक व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मुक्ताईनगरहून रावेरकडे जाणाऱ्या एसटी बसेस

नायगाव-पिंप्रीनांदू मार्गे न जाता गावाच्या बाहेरील रस्त्याने जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या मार्गावरील रस्त्याची मागणी जुनी असतानाही त्याची साफसफाई व दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने दोन्ही गावांतील नागरिकांना बससेवेचा थेट लाभ मिळत नाही.

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाढले काटेरी झुडपे सुमारे एक किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झाला असून समोरून येणाऱ्या वाहनांना व्यवस्थित जागा मिळत नाही. परिणामी वाहतुकीत अडथळे निर्माण होत असल्याने बस चालकांनी पर्यायी बाहेरील मार्गाचा अवलंब केल्याचे सांगितले जात आहे.

विद्यार्थिनींना सर्वाधिक त्रास

नायगाव व पिंप्रीनांदू येथून मोठ्या संख्येने विद्यार्थी मुक्ताईनगर व रावेर येथे शिक्षणासाठी ये-जा करतात. मात्र बसेस गावात न येत असल्याने विद्यार्थ्यांना गावातून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या पिंप्रीनांदू पुलापर्यंत पायी जावे लागते. विशेषतः विद्यार्थिनींना उन्हाळा, पावसाळा आणि सकाळच्या वेळेत मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

ग्रामस्थांची मागणी

ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाने तातडीने रस्त्याची साफसफाई करून झुडपे काढावीत तसेच रस्त्याची दुरुस्ती करून एसटी बससेवा पुन्हा गावातून सुरू करा अन्यथा आंदोलनाचा इशारा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

रावेर-पुनखेडा-पातोंडी मार्गाची दुरवस्था; डांबरीकरणाच्या विलंबामुळे नागरिक संतप्त खड्डे, सैल खडी आणि उडणाऱ्या धुळीमुळे...

0
रावेर, दि. 30 (प्रतिनिधी)- पुनखेडा-पातोंडी या महत्त्वाच्या मार्गाचे काम अपूर्ण राहिल्याने नागरिक आणि शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे...

बुऱ्हाणपूर – अंकलेश्वर महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीला ऐतिहासिक यश…

0
रावेर दि .29 (प्रतिनिधी )  बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे तसेच रावेर शहरात महिलांसाठी ठिकठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत या...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

मुंबई मंत्रालयात रिपब्लिकन कामगार सेनेचे निवेदन; अन्यायग्रस्तांना न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा

0
मुंबई दि .1 (प्रतिनिधी) – रिपब्लिकन सेना / रिपब्लिकन कामगार सेना राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व राज्य अध्यक्ष युवराज...

रावेर-पुनखेडा-पातोंडी मार्गाची दुरवस्था; डांबरीकरणाच्या विलंबामुळे नागरिक संतप्त खड्डे, सैल खडी आणि उडणाऱ्या धुळीमुळे...

0
रावेर, दि. 30 (प्रतिनिधी)- पुनखेडा-पातोंडी या महत्त्वाच्या मार्गाचे काम अपूर्ण राहिल्याने नागरिक आणि शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे...

बुऱ्हाणपूर – अंकलेश्वर महामार्गाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याच्या मागणीला ऐतिहासिक यश…

0
रावेर दि .29 (प्रतिनिधी )  बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे तसेच रावेर शहरात महिलांसाठी ठिकठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्यात यावीत या...
error: Content is protected !!