Homeताज्या बातम्यारसलपुर-बक्षीपुर ग्रामपंचायतींच्या गैरकारभाराची चौकशी अजूनही 'थंडबस्त्यात'... तक्रारींना महिने उलटले; विस्तार अधिकाऱ्यांवर...

रसलपुर-बक्षीपुर ग्रामपंचायतींच्या गैरकारभाराची चौकशी अजूनही ‘थंडबस्त्यात’… तक्रारींना महिने उलटले; विस्तार अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कामांचा ताण सांगत चौकशी रखडली ISO नामांकित पंचायत समितीच्या कारभारावर नागरिकांचा सवाल

रावेर दि . 12 ( प्रतिनिधी ) रसलपुर व बक्षीपुर ग्रामपंचायतींमधील कथित गैरकारभार व आर्थिक अनियमिततांबाबत ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींची चौकशी अजूनही थंडबस्त्यातच पडून असल्याचे चित्र समोर आले आहे. तक्रारी दाखल होऊन बराच कालावधी लोटला असतानाही पंचायत समिती प्रशासनाकडून कोणतीही ठोस चौकशी सुरू नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या कामकाजात अनियमितता, विकासकामांतील कथित गैरव्यवहार तसेच निधी वापराबाबत प्रश्न उपस्थित करत पंचायत समितीकडे लेखी तक्रारी सादर केल्या आहेत. मात्र, तक्रार व प्राथमिक चौकशी देखील सुरू नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे .

दरम्यान, ग्रामपंचायत विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांकडे विविध योजना, प्रशासकीय कामे तसेच बैठकींचा मोठा ताण असल्याने चौकशी प्रक्रियेला विलंब होत असल्याचे सांगितले जात आहे. परंतु गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असूनही चौकशी न होणे ही बाब नागरिकांमध्ये संशय निर्माण करणारी ठरत आहे.

 

विशेष म्हणजे संबंधित पंचायत समितीला ISO नामांकन मिळाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात लोकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नसल्याने “ISO फक्त नावालाच करीत आहेत. पारदर्शकताची टीका ही नागरिकांकडून का?” असा प्रश्न ग्रामस्थ उर्ण व उत्तरदायित्वाचा अभाव केली जात आहे.

ग्रामस्थांचा थेट आरोप

तक्रारी करून ही चौकशी होत नसल्याने प्रशासन गैरकारभार झाकण्याचा प्रयत्न करत आहे का, असा संशय निर्माण झाला आहे. पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी यांनी तातडीने चौकशी करून सत्य बाहेर आणावे.” – ग्रामस्थ

जनतेच्या मनात निर्माण झालेले  प्रश्न..

तक्रारींवर अद्याप चौकशी का सुरू झाली नाही?विस्तार अधिकाऱ्यांवरील कामाचा ताणच एकमेव कारण आहे का?ISO नामांकन असूनही नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष का ?

आंदोलनाचा इशारा

रसलपुर व बक्षीपुर ग्रामपंचायतींमधील गैरकारभाराच्या तक्रारींची तात्काळ व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर चौकशी सुरू न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...

रावेरमध्ये भारत बंद यशस्वी; ओबीसी जनगणनेच्या मागणीसाठी रास्ता रोको…

0
रावेर, दि. २४ (प्रतिनिधी)- "सामाजिक आंदोलनासाठी प्रामाणिक लोक रस्त्यावर उतरतात, तर बेईमान लोक तमाशा पाहतात," या घोषणेसह रावेर शहरात भारत बंदला जोरदार प्रतिसाद मिळाला....

रावेरमध्ये प्रथमच दिव्यांगांचा सामूहिक विवाह सोहळा; समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम

0
रावेर दि .17(प्रतिनिधी) : दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने आणि स्वावलंबी जीवनाची नवी दिशा देण्याच्या उद्देशाने दिव्यांग जनकल्याण बहुउद्देशीय संस्था, रावेर यांच्या वतीने येत्या रविवार, दिनांक...

महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख

0
भारतीय इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात, ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित राहत नाही, तर पिढ्यानपिढ्या समाजाला दिशा देत राहते. अशा महान व्यक्तिमत्त्वांमध्ये अग्रक्रमाने...

अंतुर्लीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी; समस्या सोडविण्याच्या सूचना

0
मुक्ताईनगर दि .10 ( प्रतिनिधी ) अंतुर्ली परिसरात अवकाळी पाऊस, गारपीट व वादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची पाहणी केल्यानंतर मा. रक्षा ताई खडसे यांनी संजय...

मोकाट फिरणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करा; पीडित कुटुंबाला संरक्षण द्या – आनंदभाऊ खरे यांची...

0
पाचोरा दि .7 (प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याने संताप व्यक्त होत असून,...
error: Content is protected !!