कोपरगाव दि .30 प्रतिनिधी ( नवनाथ उल्हारे ) सोलापूर जिल्ह्यावर आलेल्या भीषण महापुराने हजारो घरं उद्ध्वस्त केली.कोणाचं छप्पर कोसळलं, कोणाचं आयुष्यभराचं कष्टाचं धान्य वाहून गेलं, तर कोणाचा संसार पाण्याच्या लोटात गेला.
आईंच्या डोळ्यात अश्रू, लेकरांच्या चेहऱ्यावर भीती आणि शेतकऱ्यांच्या मनात भविष्यासंबंधी अनिश्चिततेची काळी छाया पसरली.अशा या संकटात लोक निराधार झाले, असहाय झाले.मात्र या भीषण महापुरात जेव्हा प्रत्येक नागरिकाला आधाराची गरज होती,तेव्हा त्यांच्या सोबत खंबीरपणे उभं राहिलं ते फक्त…उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः पुढाकार घेऊन प्रशासनाला सजग केलं,
जनतेच्या मदतीसाठी उपाययोजना केल्या आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना लोकांच्या सेवेत झोकून दिलं.शिंदे साहेबांचं नेतृत्व हे संकटकाळातल्या आशेचं किरण ठरलं.शिवसेना कार्यकर्ते गावोगावी, घराघरात धावून गेले,अन्न, पाणी, वैद्यकीय मदत आणि सुरक्षित ठिकाणी स्थलांतर यासाठी त्यांनी अविरत परिश्रम घेतले.जनतेच्या वेदना त्यांनी स्वतःच्या वेदना मानल्या.
सोलापूरकरांना जाणवतंय की संकट कितीही मोठं असलं तरीत्यांच्या पाठीशी आधार देण्यासाठी, अश्रू पुसण्यासाठी आणि नव्या आयुष्याला सुरुवात करण्याची ताकद देण्यासाठी शिवसेनाआणि मा.एकनाथ शिंदे साहेब खंबीरपणे सोबत आहेत.कारण शिवसेना हे फक्त राजकीय पक्ष नाही,तर संकटात जनतेच्या डोळ्यातला अश्रू पुसणारी खरी आई-वडिलांसारखी सावली आहे…
मीनाक्षीताई वाकचौरे
शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख कोपरगाव.
शिव उद्योग संघटना जिल्हाप्रमुख (उत्तर अहिल्यानगर).
























