बारामती दि . 26 प्रतिनिधी ( विश्वजा कदम )शारदा नगर परिसरातील कॉलेजसमोरील मुख्य रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्याने अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी व नागरिक ये-जा करत असून, अनेक वेळा वाहनांचे वेग व नियंत्रण सुटल्यामुळे दुर्घटना घडत आहेत.
स्थानिक रहिवासी आणि विद्यार्थ्यांच्या सांगण्यानुसार, मागील काही महिन्यांमध्ये या ठिकाणी लहान-मोठे मिळून तब्बल १० पेक्षा अधिक अपघात घडले आहेत. दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना विशेषतः कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसत आहे.
विद्याथींचे मत
“दररोज कॉलेजला जाताना जीव मुठीत घेऊन रस्ता पार करावा लागतो. वाहनांच्या वेगावर कोणतेच नियंत्रण नाही. आम्ही अनेक वेळा स्थानिक प्रशासनाकडे स्पीड ब्रेकरसाठी मागणी केली आहे, पण अजून काहीही कारवाई झालेली नाही.”
स्थानिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, तात्काळ या ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवावा आणि आवश्यक त्या सुरक्षितता उपाययोजना कराव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांचे आणि नागरिकांचे जीव वाचू शकतील.
























