रावेर दि .21 (लक्षवेध न्युज नेटवर्क ) आठवडाभरापासून विटवा आणि धामोडी या गावातील घरकुल घोटाळे बाहेर आली आहेत ; मात्र अजूनही प्रशासनामार्फत चौकशी झालेली नाही किंवा तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी यांना प्रशासनाने साधी नोटीस काढून स्थानिक पातळीवरून खुलासाही मागितलेला नाही.
विटवा येथे जगदीश बावस्कर तर धामोडी येथे सरला कोळी या ग्रामपंचायत अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. ग्रामपंचायतीच्या परस्पर काही राजकीय पदाधिकारी लाभार्थींचे प्रस्ताव तयार करतात आणि प. स. स्तरावर हे प्रस्ताव स्वीकारून तत्कालीन बीडीओ के.पी.वानखेडे हे लाभार्थी यांचेकडे जागा आहे की नाही,याची खात्री न करताच अनुदान वितरित करतात,तरी तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी ढिम्म बसतात,याचा अर्थ काय समजायचा?
जगदीश बावस्कर आणि सरला कोळी या दोघांनी यावर्षी स्वतः हून तालुक्याच्या बाहेर विनंती बदल्या केल्या आहेत,बदलीला हे तर कारण नसेल?
रावेर तालुक्यात दोन वर्षांपूर्वी संगनमताने शौचालय घोटाळा झाला होता.गुन्हा दाखल झाल्यावर गावोगावी एजंट सापडले होते.तसेच या दोन्ही गावात एजंट कार्यरत असल्याची बातमी मिळत आहे.
हे एजंट कोण आहेत? हे गावांना ही माहीत आहे आणि पंचायत समितीतील घरकुल विभागातील कर्मचारी आणि गृह निर्माण अभियंत्याना ही माहीत आहे,प्रशासन त्यांची आता झाडाझडती घेईल का? हा प्रश्न आहे,पुढील आठवड्यात मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल रावेर पंचायत समिती स्तरावर तक्रार निवारण सभा घेणार आहेत,त्यात या घोटाळ्याबाबत तत्कालीन बीडीओ के.पी.वानखेडे,गणेश सपकाळे,धीरज धनगर आणि ग्रामपंचायत अधिकारी जगदीश बावस्कर ,सरला कोळी यांचे विरुद्ध काय निर्देश देतात,ते पहावे लागेल.
























