रावेर (प्रतिनिधी ) दि . 26 शांतीदूत नगरातील रहिवाशांना सध्या रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सततच्या संतधार पावसामुळे रस्ते चिखलमय झाले असून, पाणी पुरवठा पाईप लाईनच्या खोदकामामुळे पिवळी माती खोदल्यामुळे मोटार सायकल चालविणाऱ्यांसाठी हे रस्ते धोकादायक ठरत आहे. अशा अस्वच्छ आणि अपुरी देखभालीच्या परिस्थितीमुळे नागरिकांची चिंता आणि नाराजी वाढत आहे.
संतधार पावसामुळे रस्त्यांवरील चिखलाचा थर वाढल्यामुळे शांतीदूत नगरातील रस्त्यावर चालणे अत्यंत कठीण झाले आहे. खासकरून वळणांवर आणि उंच जागींवर हा चिखल साचल्याने चालणाऱ्या लोकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच थोड्याशा पावसातच रस्त्यावर खडडे तयार होवुन, ज्यामुळे रस्त्याचा प्रवास खूपच धोकादायक ठरतो.
शांतीदूत नगरातील मुख्य समस्या म्हणजे पाणी पुरवठा पाईप लाईन खणकामामुळे झालेला पिवळ्या मातीचा ढिग जो मागील काही आठवड्यांपासून रस्त्यावर दिसत आहे. या पिवळ्या मातीवरून परिसरातील मोटार सायकल चालविणारे घसरून अपघात होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी या धोक्याबाबत नगरपरिषदेकडे तातडीने लक्ष देण्याची विनंती केली आहे.
नागरिकांचे मत आहे की, शांतीदूत नगरात नगरपरिषद त्वरीत उपाययोजना करावी. चिखलमय रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी आणि पाणी पुरवठा पाईप लाईनचे खोदकाम पूर्ण करून रस्ते स्वच्छ करण्यासाठी तातडीने काम हाती घ्यावे. नागरिकांची तीव्र मागणी आहे की, नगरपरिषद शांतीदूत नगरातील रस्त्यांच्या दयनीय स्थितीवर त्वरीत लक्ष देऊन योग्य तोडगा काढावा.
शांतीदूत नगरातील रस्त्यांची दयनीय अवस्था संतधार पावसामुळे आणि अपुरी देखभालीमुळे समस्या निर्माण करत आहे. रस्त्यांवरील चिखल आणि पिवळ्या मातीमुळे नागरिकांना दैनंदिन हालचालींमध्ये मोठा त्रास सहन करावा लागत असून, अपघातांची भीती वाढली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी नगरपरिषदकडे तातडीने आणि प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शांतीदूत नगरातील रस्त्यांची संपुर्ण दुरुस्ती आणि नियोजनासाठी नगरपरिषदने योग्य उपाय योजना कराव्या अशी नागरीकांची मागणी होत आहे .
























