रावेर दि . 28 (प्रतिनिधी ) रावेर नगर परिषदेचा कारभार “रामभरोसे” सुरु आहे, असा आरोप नागरिक व नगरपरिषदेचे माजी सभासद करीत आहेत. प्रभारी मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांनी पदभार स्वीकारल्या पासुन फक्त शासकीय कार्यक्रमांना हजेरी लावतात कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी चक्क फैजपुर येथे जावे लागत आहे . प्रभारी पदभार असला तरी एक दिवस तरी कार्यालयात येणे बंधनकारक असतांना मुख्याधिकारी नियम धाब्यावर बसवुन मनमानी पद्धतीने वागत आहे असे नागरिक सांगत आहेत. त्यांनी एक महिन्यापासून कार्यालयात हजर न राहिल्यामुळे नगरपरिषदेच्या दैनंदिन कामकाजात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत; त्यामुळे नागरिक व प्रतिनिधी मागणी करीत आहेत की जिल्हाधिकारी यांनी कायम स्वरुपी तातडीने मुख्याधिकारी यांची नियुक्त करावी अशी मागणी केली आहे .
प्रभारी मुख्याधिकारी अविनाश गांगोडे गेल्या तीन चार महिन्यांपासून रावेर नगरपरिषदेचा प्रभारी पदभार घेतला असुन त्यांनी फक्त शासकीय मिटीगांना हजेरी लावली आहे . बाकी कामकाज ते फैजपुर येवून चालवित आहे . सुमारे एका महिन्यापासून नियमितपणे कार्यालयात हजर नाहीत. फक्त मोठ्या शासकीय बैठकींमध्ये त्यांचे नाव नोंदले जाते, मात्र दिनचर्येचे प्रशासकीय कामकाज, योजना अंमलात आणणे व लोकांशी प्रत्यक्ष संवाद कमी झाल्यामुळे नागरिक सेवांमध्ये विलंब आणि गोंधळ निर्माण झाल्याचे नागारिक सागंत आहे.
नगर परिषदेचे कारभारः अनुपस्थितीमुळे महत्त्वाच्या निर्णयांवर विलंब झाला आहे – सार्वजनिक स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, शासकीय अनुदानांचे वाटप आणि इतर मूलभूत सेवांच्या कामकाजात अडथळे येत आहेत. काही सभासद म्हणतात की सध्याचा कारभार “रामभरोसे” सुरु असल्याने नियोजित कामे वेळेच्या आत पूर्ण होत नाहीत.
नागरिकांची मागणीः रावेरमधील नागरिक, व्यापारी व नगरपालिका प्रतिनिधी यांनी जिल्हाधिकारी यांच्या कडे कायमस्वरूपी मुख्याधिकारी (CEO) नियुक्त करण्याची विनंती केली आहे नागरिकांचे म्हणणे आहे की कायमची नियुक्ती झाल्यास प्रशासनिक स्थिरता येईल आणि लोकसुविधा तत्काळ सुरळीत होतील .
प्रशासनाची भूमिकाः अजूनपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अधिकृत निवेदन आलेले नाही, परंतु स्थानिक स्तरावर ही तक्रार नोंदविण्यात आली असल्याची माहिती आहे. की नविन जिल्हाधिकारी रोहन धुगे यांनी परिस्थितीची चौकशी करावी व कायमस्वरूपी पावले उचलावीत.
स्थिर प्रशासनाशिवाय नगरपालिका कामे प्रभावीपणे चालू ठेवणे कठीण होते. प्रभारी मुख्याधिकारींची दीर्घकाळ अनुपस्थिती योजना राबवण्यात, निधी वापरात आणि सार्वजनिक सेवांमध्ये त्रास वाढत आहे त्यामुळे प्रशासनाने पद्धतशीरपणे कायमस्वरूपी अधिकारी नियुक्त करून जगण्याच्या गरजा पूर्ण करणे आवश्यक आहे. तातडीने प्रमुख पदांच्या रिक्ततेवर कारवाई न झाल्यास नागरिकांतील असंतोष वाढण्याची ही शक्यता निर्माण होऊ शकते.
नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना जावे लागत आहे फैजपुर येथे कामकाजासाठी…
सध्या नगरपरिषद निवडणूकीचे कामकाज सुरु आहे 10 /15 कर्मचाऱ्यांना फैजपुर येथे कामकाजासाठी जावे लागत आहे परंतु मुख्याधिकारी रावेरला येत नाही ही कर्मचाऱ्यांची पिळवणूक नाही का ? निवडणूकीच्या कामकाजाचा विषय देखील गार्भियाने घेत नाही असे एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर लक्षवेध न्युज प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले .
रावेर नगर परिषदेच्या कारभारात सध्या असलेला अनिश्चितपणा आणि प्रभारी मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांच्या निष्क्रिय बाबतच्या तक्रारींमुळे नागरिक तातडीने कायम मुख्याधिकारी नियुक्त करण्याची मागणी करत आहेत. जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी यांनी या प्रकरणाची दखल घेऊन त्वरीत उपाययोजना कराव्यात, असा स्थानिकांचा आग्रह आहे. प्रशासनाकडून लवकरच स्पष्टता आणि ठोस पावले उचलली गेली तरच नगर परिषदेचे कामकाज पुनरुज्जीवित होऊ शकेल.























