Homeताज्या बातम्यारावेर नगरपरिषदेची नाले सफाई: फक्त थातुरमाथुर देखावा, हजारो टन गाळ नाल्यामध्येच पडून...

रावेर नगरपरिषदेची नाले सफाई: फक्त थातुरमाथुर देखावा, हजारो टन गाळ नाल्यामध्येच पडून दुर्गंधीने नागरिक त्रस्त

रावेर (लक्षवेध न्युज नेटवर्क ) दि .16 रावेर येथील नगरपरिषदेच्या नाले सफाईच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील आठवडयात नागझिरी नाल्यातील गाळ फक्त एक दिवस पोकलॅडच्या साह्याने मोजून एक दिवस जमा करण्यात आला. मात्र, हजारो टन गाळ नाल्यामध्येच पडून आहे आणि त्यामुळे परिसरातील नागरिक दुर्गंधीच्या त्रासाने सतत त्रस्त होत आहेत. लोकांना नाला स्वच्छ करण्याच्या ऐवजी फक्त थातुरमाथुर देखावा असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे.

नागझिरी नाल्यातील गाळ सफाईत कोठेच प्रगती नाही

नाले सफाईसाठी वापरलेलं पोकलॅड केवळ दोन दिवस बंद सुरू काम करून जमा झालेला गाळ फेकण्यात आला. मात्र, नाला कडेला लावलेला हजारो टन गाळ अजून ही उचललेला नाही. या गाळामुळे केवळ प्रदुषणच नाही तर परिसरात दुर्गंधीने नागरिकांचा त्रास वाढला आहे. खास करून नागझिरी नाल्याच्या आजूबाजूला राहणाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकृती बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरीकांनी प्रशासनविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

नगरपरिषदेतील मनमानी प्रशासन

मुख्याधिकारी अभिजित कदम यांची बदली होण्याची प्रक्रिया प्रलंबित असल्यामुळे ते नगरपरिषदेच्या कामकाजाकडे इच्छेनुसारच लक्ष देत असल्याची चर्चा आहे. या कारणामुळे सफाई कामांमध्ये मनमानी कारभार वाढल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे वातावरणातील या रोगदायी दुर्गंधीला जर लवकरच उचलले नाही तर नागरीकांचा रोख वाढण्याचीही शक्यता आहे. नाले सफाई फक्त नाट्यमय देखाव्यापुरती मर्यादित ठेवून लोकांना फसवण्याचे कारस्थान नगरपरिषदेच्या निवडणुकीपर्यंत सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नगरपरिषदेचा प्रशासन आणि नागरिकांची समस्या

रावेर नगरपरिषदेच्या नाले सफाई कामाचा आढावा घेतल्यास दिसून येतो की, हे कार्य सध्याच्या स्वरूपात फक्त देखावूपणा करून वरिष्ठ अधिकारी बदलीच्या हालचाली मुळे मनमानी कारभार चालू आहे. हजारो टन गाळ नाल्यातून काढून बाहेर टाकण्याची जबाबदारी पूर्ण होत नसेल तर नागरीकांचे आरोग्य आणि परिसराची स्वच्छता गंभीर धोक्यात येत आहे. नगरपरिषदेने तातडीने योग्य ती धोरणे आखून नाले स्वच्छतेबाबत उपाय योजना कराव्या, अन्यथा निवडणुकीपूर्वी लोकशाही प्रक्रियेवरही गंभीर परिणाम होऊ शकतो.

या गंभीर समस्येवर प्रशासनाने त्वरित हातोडा घालून नागरिकांचे आरोग्य आणि स्वच्छता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. नाहीतर रावेर नागरिकांची कायमची नापसंती वाढत राहणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...

गाते ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या ग्रामसभेत महापुरुषांच्या प्रतिमांची विटंबना; गावकऱ्यांच्या संतप्त भावना, गट विकास अधिकाऱ्याकडे...

0
रावेर दि . 5 प्रतिनिधी (प्रशांत गाढे ) रावेर तालुक्यातील गाते (सावदा स्टेशन गाते) ग्रामपंचायतमध्ये 26 जानेवारीच्या पारंपरिक ग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला वादग्रस्त वातावरणाने...

संत रोहिदास जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय पाट्या व स्नेहभोजन…“मन चंगा तो कठौती में गंगा” – संत...

0
काहूरखेडे ता .भुसावळ (प्रतिनिधी )“शिक्षणाने उजळे जीवन, संस्कारांनी वाढे मान, संत रविदास विचारांनी घडती लहानग्यांचे भान.” संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त राधाकृष्ण श्री...

व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते – दीपध्वज कोसोदे

0
मुक्ताईनगर दि .1 ( प्रतिनिधी ) सोळाव्या शतकात भारतीय समाजव्यवस्थेशी लढणे सोपे नव्हते, अभावग्रस्त समाजात जन्म घेऊनही व्यवस्थेशी लढणारे रोहिदास हे खरे संत होते,असे...

रावेर नगरपरिषदेच्या डंपींग ग्राऊंडला भीषण आग… आग लावली का ? आग लागली …

0
रावेर दि .27 (प्रतिनिधी ) रावेर नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या डंपींग ग्राऊंडमध्ये काल रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार या आगीमुळे परिसरात धूर...

विवरे येथे उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा

0
विवरे ॥ बु ॥ प्रतिनिधी (जमील शेख ) रावेर तालुक्यातील विवरे व परिसरात ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विवरे येथील ग्रामपंचायत...
error: Content is protected !!