मुक्ताईनगर दि .20 लक्षवेध न्युज नेटवर्क ) मुक्ताईनगर परिसरात इंदौर हायवे मध्ये शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचा ताबा घेतल्यामुळे सध्या या शेतकऱ्यांची मोठी आंदोलने सुरू आहेत. या संदर्भात स्थानिक आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी या शेतकरी बांधवांचा पाठिंबा देत मोबदला योग्य रकमेचा मिळावा यासाठी त्यांच्या सोबत चर्चाचे आयोजन केले. तसेच, जोपर्यंत न्याय मिळत नसेल तोपर्यंत उग्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचे आश्वासन ही दिले आहे.
मुक्ताईनगर येथे इंदौर हायवे मध्ये अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी प्रभावित झाल्या असून त्यावर शेतकऱ्यांना न्याय मिळत नसल्याचा प्रकार आहे. या संदर्भात आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी “शेतकरी बांधवांना योग्य मोबदला मिळणे अत्यंत गरजेचे आहे. तो पर्यंत आम्ही त्यांच्या बाजूने उभे राहू आणि आवश्यक ती आंदोलनं करू,” असे स्पष्ट केले.
या चर्चा मध्ये मोठ्या संख्येने शेतकरी बांधव, त्यांचे पदाधिकारी तसेच शिवसेना पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. उपस्थितांनी आमदारांची भूमिका पाठींब्याची असल्याचे जाहीर केले व परिसरातील शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
शेतकऱ्यांच्या जमिनी वर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात स्थानिक नेते व शेतकरी बांधव एकजूट होणे महत्त्वाचे असल्याचे या चर्चमध्ये दिसून आले. शेतकरी बांधवांनी ही आपल्या हक्कांसाठी युद्ध पातळीवर संघर्ष करण्याची तयारी दर्शविली आहे.
मुक्ताईनगर येथील इंदोर हायवे वरून प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या शेतकऱ्यांना योग्य न्याय आणि मोबदला मिळवून देण्यासाठी आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांचे समर्थन आणि शिवसेना पक्षाचा साथ आहे. या घटनाक्रमातून स्थानिक शेतकरी बांधवांच्या हक्कांसाठी सज्ज असलेली शांतता राखणारी पण उग्र स्वरूपाची आंदोलनाची तयारी दिसून आली आहे. आगामी काळात या विषयावर स्थानिक प्रशासन आणि सरकारकडून योग्य तो निर्णय अपेक्षित आहे.
























