जळगाव ( प्रतिनिधी ) दि . 10 जिल्ह्यातील नागरिकांना भूसंपादनासाठी भूसंपादन अधिकारी कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागत आहे; या कार्यालयात सेवा अत्यंत जिकरीची असून नागरिकांना न्याय मिळणे अत्यंत कठीण झाले आहे. विशेषतः आदिवासी व इतर जमीन विक्री परवानगीसाठी आवश्यक असणारा भू-संपादनाचा दाखला मिळवण्यासाठी अनेक नागरिकांना चकरा माराव्या लागत आहे 5 महिन्यांपासून कार्यालयाकडे अर्ज करून देखील कामे होत नसल्या च्या तक्रार आहे .
भूसंपादन अधिकारी जयश्री माळी यांची अनुपस्थिती नागरिकांची तक्रार
भूसंपादन अधिकारी जयश्री माळी यांचे कार्यालय कुलुप लावून बंद असून, नागरिकांना भेट देण्याची व प्रक्रिया पार पाडण्याची संधी मिळत नाही. नागरिकांनी बारकोड प्रणालीद्वारे ही कोणतीही प्रक्रिया होत नसल्याचे तक्रार केली आहे. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढू लागली आहे आणि वेळ फुकट जात आहे. विशेषत: आदिवासींना आणि जमीन विक्रीसाठी परवानगी हवी असलेल्या नागरिकांना ही परिस्थिती अत्यंत त्रासदायक ठरली आहे.
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे नागरिकांची मागणी
जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे त्वरीत या प्रकरणाची चौकशी करून भूसंपादन अधिकारी कार्यालयातील सेवा सुरळीत होण्याची आणि नागरिकांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. “कायद्यानुसार भूसंपादनाचा दाखला मिळवणे हे प्राथमिक हक्क असून, त्यासाठी नागरिकांना अस्वस्थ होणे अपेक्षित नाही,” असे नागरिकांचे म्हणणे आहे.
भूसंपादन अधिकारी कार्यालयात नागरिकांना वारंवार सतत चक्कर मारावी लागत असलेली परिस्थिती सुधारण्यासाठी प्रशासनाने त्वरित आवश्यक पावले उचलणे गरजेचे आहे. अधिग्रहित जमीन विक्रीसाठी तसेच आदिवासी परवानग्या यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया सोपी, पारदर्शक आणि जलद होणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी यांनी प्रकरणाचा गांभीर्याने विचार करून न्याय मिळवून द्यावा, ही जिल्ह्यातील सर्व नागरिकांची अपेक्षा आहे.
























