रावेर (प्रतिनिधी ) दि .22 पाचोरा येथील 4 पत्रकारांवर खोटे खंडणीचे गुन्हे दाखल झाल्याच्या प्रकरणाचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे यांनी त्वरित निषेध करत स्पष्टपणे सांगितले की, राज्यभरातील कोणत्याही पत्रकारांवर हा गैरप्रकार सहन केला जाणार नाही. अवैध धंद्यांविरोधात प्रकाशित झालेल्या बातम्यांमुळे पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल केले आहेत, यावर महाराष्ट्र पत्रकार संघ कडक पद्धतीने भूमिका घेणार असल्याचा इशारा दिला आहे.
पत्रकारांवरील खोटे गुन्हे म्हणजे लोकशाहीची गळचेपी..
अलीकडेच पाचोरातील काही पत्रकारांनी गेल्या महिन्यापासून अवैध धंद्यांविरोधात वेळोवेळी माध्यमातून आवाज उठवला होता.
या सत्य वृत्तांकनाचा राग मनात धरून पोलिस आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांनी संगनमत करून पत्रकारांवर खोटा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे पत्रकारांची स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेवर प्रश्न उपस्थित झाला आहे. पत्रकार संघटनेने या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन त्वरित कारवाईची मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा राज्यभर आंदोलनांचा इशारा..
डॉ. विश्वासराव आरोटे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस यांनी ही बाब राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, “अवैध धंदे उघड करण्याचे काम म्हणजे लोकहितासाठी केलेले पत्रकारांचे पवित्र कर्तव्य आहे. अशा परिस्थितीत पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांच्या कामावर बंधने आणणे हा पत्रकारितेला बाधा पोहोचवणारा निषेधार्ह प्रकार आहे. महाराष्ट्र पत्रकार संघ हे कोणत्याही परिस्थितीत अशा प्रकारची अन्याय सहन करणार नाही.”
“आमच्या अंगात शेतकऱ्याचे रक्तआहे. जर वेळ आली तर आम्ही दोन हात करण्यासही मागे हटणार नाही.”असे म्हणत डॉ. विश्वासराव आरोटे यांनी आंदोलनाचे संकेत दिले आहेत.
राज्यभरातील पत्रकारांनी कधी ही लोकांच्या हितासाठी आवाज उठवण्यास मागे हटलेले नाही. परंतु या घटनेमुळे पत्रकारांची काम करण्याचे स्वातंत्र्य व लोकशाही चा चौथा स्तंभ धोक्यात येत आहे. डॉ. विश्वासराव आरोटे यांनी पत्रकारांमध्ये एकजूट आणि संघटितपणा ठेवून योग्य न्यायासाठी लढा सुरू आहे. पत्रकाराच्या आवाजाला कुठलाही दबाव गप्प बसवु शकत नाही.हे लवकरच सिद्ध होईल.
























