यावल तालुका प्रतिनिधी ( मिलिंद जंजाळे ) दि . 4
एकीकडे महाराष्ट्र शासन मोठ्या प्रमाणात जनतेला आरोग्य सेवा पुरवण्याची हमी घेत असतांना मात्र आरोग्य विभागाकडे शासनाचे दुर्लक्ष दिसुन येत असल्याचे निदर्शनात आले आहे.
जिल्ह्यात आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात औषध साठा व गेल्या काही वर्षात पासुन रुग्ण कल्याण समिती मध्ये देण्यात येणारा निधी उपलब्ध नसल्याचे सोमोर आले आहे. शासन आरोग्य विभागावर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रित करीत आहे मात्र जळगांव जिल्हाचा विचार केला तर अनेक आरोग्य संस्थान मध्ये पाहिजे त्या प्रमाणात आरोग्य सेवा देण्यासाठी औषधं साठा उपलब्ध नसतांना कसे तरी आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांना कसरत करावी लागत आहे. जनतेला चांगल्या पद्धतीने आरोग्य सेवा मिळावी म्हणुन शासन आरोग्य विभागाकडे लक्षवेधी असतांना मात्र आरोग्य विभागात खुप कमी प्रमाणात औषध साठा उपलब्ध आहे त्या काही वर्षांपासून रुग्ण कल्याण समिती चे नाव बदल करून जन आरोग्य समिती स्थापन केलेल्या समितीच्या खात्याला निधी पासुन वंचित ठेवले जात आहे.
आरोग्य विभागात औषध नाही रुग्ण कल्याण समिती, जन आरोग्य समितीला निधी नाही त्यामुळे जनतेला आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य अधिकारी व कर्मचारी वर्गाला मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतांना दिसत आहे.असे असतांना शासन या कडे जाणून बुजून दुर्लक्ष तर करत नाही ना का शासन औषध खरीदी करण्यासाठी निधी देत आहे पण काही अधिकारी औषध खरीदी करत नाही असे तर काही नाही ना यात लपलंय काय असे प्रश्न उपस्थित होतांना दिसुन येत आहे. अगोदर मोठ्या प्रमाणात रुग्ण कल्याण समिती च्या खात्यात निधी उपलब्ध केला जात होता निधी उपलब्ध झाल्यावर त्या निधीतून रुग्णांच्या रुग्ण सेवे साठी खर्च केला जात होता मात्र आता तर जळगांव जिल्हात पाहिजे त्या प्रमाणात औषध साठा नाही व रुग्ण कल्याण समिती च्या खात्यात निधी नाही त्यामुळे मोठ्या अडचणीच्या सामोरे आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना जावे लागत असुन शासनाने आरोग्य विभागाकडे दुर्लक्ष न करतात मोठ्या प्रमाणात औषध साठा व रुग्ण कल्याण समितीत निधी उपलब्ध करून द्यावा अशी अपेक्षा सर्व सामान्य जनते कडुन केली जात आहे.
























