मुंबई (लक्षवेध न्युज नेटवर्क ) महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीने ‘महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक’ या नवीन विधेयकाविरोधात न्यायालयात लढा देण्याचा निर्धार केला आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की, हे विधेयक फुले-शाहू-आंबेडकर यांची समृद्ध विचारधारा नष्ट करणार आहे, तसेच नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर बंदी घालण्याचा प्रयत्न करीत आहे.
महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर झाल्यानंतर ही विरोधकांकडून आवश्यक ती सावधगिरी नाही दिसल्याने हे विधेयक दडपशाही, असंवैधानिक मनमानी आणि गंभीर गैरवापरासाठी प्रवृत्त असल्याचे अनेक तज्ज्ञांचे मत आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या सामाजिक समतेच्या विचारांची जाणीव असणाऱ्या जनतेसाठी हे विधेयक गंभीर आव्हान ठरणार आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली न्यायालयात ज्येष्ठ वकीलांच्या मदतीने या विधेयका विरुद्ध कायदेशीर लढा चालवण्यात येणार असून, नागरिकांच्या मूलभूत स्वातंत्र्यांचे संरक्षण करण्यासाठी प्रयत्न अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक : दडपशाही आणि गैरवापरासाठी प्रोत्साहन
मंडळांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि राजकीय नेत्यांनी या विधेयकाविरोधात आवाज उठवला पाहिजे असा आग्रह वंचित बहुजन आघाडीने व्यक्त केला आहे. यामुळे महाराष्ट्र मधील राजकीय वातावरण अधिकच तापले असून, सामाजिक शांतीस मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
‘महाराष्ट्र जन सुरक्षा विधेयक’ हा कायदा दिलेल्या लोकशाही अधिकारांना, विशेषत: वंचित आणि बहुजन समाजाला सेवाभावी फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारधारेच्या विरोधात मानला जातो. ॲड. प्रकाश आबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी यांनी न्यायालयात या विधेयकाच्या विरोधात लढा देऊन लोकशाही जपण्याचा निर्धार केल्याने या मुद्द्यावर सर्वसामान्यांचा लक्ष वेधले आहे. महाराष्ट्रात या विधेयकाविरोधात सामाजिक जागरूकता आणि सक्रियता वाढवणे अत्यंत आवश्यक आहे .
























