रावेर (लक्षवेध न्युज नेटवर्क ) दि . 4 रावेर तालुक्यातील मौजे ऐनपुर येथील गट क्रमांक 444 व 450 मध्ये अनाधिकृत पणे गौणखनिज वाहतुक होत असल्याच्या गंभीर प्रकरणावर ग्रामपंचायत ऐनपुर कडून तहसिल कार्यालयाला तातडीने कारवाई करण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला आहे. या अनधिकृत वाहतुकीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त असून प्रशासनाकडून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामपंचायतने गंभीर आंदोलनाचा इशारा दिला आहे.
अनाधिकृत गौणखनिज वाहतुक
मौजे ऐनपुर गौणखनिज क्षेत्रात दररोज 50 ते 60 ट्रॅक्टर व जेसीबी यांसह मोठ्या प्रमाणात अनधिकृत वाहतुक केली जात असल्याचा गंभीर आरोप आहे. या वाहतुकीमुळे परिसरातील जनता वातावरण, राहणीमान व वाहतूक व्यवस्थेसह अनेक प्रकारे त्रासदायक आहे. तलाठी व मंडळ अधिकारी यांना तोंडी सूचना करूनही कोणतीही दखल न घेतल्यामुळे या प्रकरणाची चौकशी करणे व योग्य ती दखल घेणे अत्यावश्यक ठरले आहे.
ग्रामपंचायतकडून तहसिल कार्यालयाकडे तक्रार व आंदोलनाचा इशारा
मौजे ऐनपुर ग्रामपंचायतचे सरपंच अमोल प्रभाकर महाजन, उपसरपंच पंकज गोविंदा पाटील आणि सदस्यांसह एकमताने तहसिलदार कार्यालयाकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. जर तीन दिवसांत गौणखनिज वाहतुकीवर प्रतिबंध न घालण्यात आला नाही तर ग्रामपंचायत पदाधिकारी आमरण उपोषण करण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गावातील नागरिकांचा आवाज प्रशासनाकडे पोहोचवण्यासाठी हा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
प्रशासनाने कडक कारवाई करणे आवश्यक
ग्रामपंचायतची प्राथमिक मागणी आहे की तहसिल कार्यालयाने तत्काळ प्रभावी कारवाई करून अनधिकृत गौणखनिज वाहतुकीवर पूर्ण बंदी घालावी. या समस्येमुळे होणाऱ्या पर्यावरणीय आणि सामाजिक त्रासाला योग्य तो प्रतिसाद देणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनाने ग्रामपंचायतकडून मिळालेल्या अर्जाचा गांभीर्याने विचार करून स्थानिक लोकांच्या त्रासाचे निराकरण करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
गावातील अनाधिकृत गौणखनिज वाहतुकीमुळे होणाऱ्या त्रासाला प्रशासनाने अजून ही पुरेशा प्रमाणात प्रतिसाद दिलेला नाही. ग्रामपंचायत ऐनपुर कडून त्वरित कारवाईची मागणी केल्याने या प्रकरणावर परिस्थिती गंभीर बनली आहे. रावेर तहसिल कार्यालयाने स्थानिक लोकांच्या हितासाठी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी लवकरात लवकर कारवाई करणे आवश्यक आहे. अन्यथा, ग्रामपंचायत पदाधिकारी आंदोलन करणार आहे.
























