रावेर दि . 13 (प्रतिनिधी ) रावेर तालुक्यातील अहिरवाडी ते पाडले या सुमारे 5 किलोमीटर लांबच्या रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांसाठी तसेच पायी चालणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याची पुरेसा रुंदी नसल्यामुळे अनेक ठिकाणी वाहने एका बाजूला थांबूनच परस्पर उलटफेर करावी लागत असून, पावसाळ्यात येताना चिखलाने रस्ते तर अत्यंत खराब झाली आहेत.
तसेच, निरूळ ते पाडले या 2 किलोमीटर रस्त्याची स्थिती देखील तशीच आहे . ह्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देत अहिरवाडी या दोन्ही रस्त्यांचे डांबरीकरण व रुंदीकरण करण्याची मागणी तत्कालीन उपसरपंच रवींद्र रायपुरे यांनी मागणी केली आहे ज्यामुळे स्थानिक प्रशासन व जिल्हा विकास समितीने तातडीने याकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त आहे.
स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, सध्या रस्त्याची खराबस्थिती मुळे रोजच्या वाहनधारकांना व पायी चालण्याच्या वेळी अनेक प्रकारचे अपघात घडू शकतात. त्यामुळे तातडीने या रस्त्याची सुधारणा करण्यात यावी अशी मागणी आहे .
सरकारी यंत्रणा व स्थानिक प्रशासनाने या मागणीकडे गांभीर्याने पाहून लवकरात लवकर रस्त्याच्या डांबरीकरणाला आणि रुंदीकरणाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. यामुळे परिसरातील रहिवासी सुरक्षितपणे फिरू शकतील तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेचा सुद्धा विकास होईल.
अहिरवाडी ते पाडले व निरूळ ते पाडले या रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे नागरिकांच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण होत आहेत. रावेर -यावल विधानसभा मतदार संघाचे आमदार अमोलभाऊ जावळे यांनी आणि स्थानिक रहिवाशांच्या समस्या प्रशासनाने गांभीर्याने घेतले पाहिजे. तातडीने डांबरीकरण व रुंदीकरणाचे काम सुरु करून या मार्गाचे नूतनीकरण व्हावे यासाठी कार्यवाही होणे आवश्यक आहे. अशी मागणी पाडले येथील तत्कालीन उपसरपंच रवींद्र रायपुरे यांनी तक्रार निवारण सभेत केली आहे .
























